26 February 2007

रेल्वे अर्थसंकल्प: महाराष्ट्रावर पुन्हा अन्याय? Railway budget with discrimination against Maharashtra

नेहमी प्रमाणे नेहमीच्या 'बिहारी' रेल्वेमंत्र्यांनी नेहमीच पाने पुसल्या जाणाऱ्या महाराष्ट्रावर या ही वेळेस नेहमीच्या रेल्वे अर्थसंकल्पात अन्याय केला आहे. मला राग आणि विषाद वाटतो तो महाराष्ट्रातील खासदार (members of parliament) यांचा हे लोक, आपल्या राज्याच्या भल्यासाठी लालूंवर दबाव का आणीत नाहीत? मुंबई जी रेल्वेला उत्पन्नाबाबत सिंहाचा वाटा देते तिथे फक्त उत्तर प्रदेश बिहार व अन्य बिमारु राज्यातील गाड्या आणल्या जातात. त्यात भर म्हणून पुणे-गोरखपूर गाडी सुरु केली आहे. माझ्या माहितीप्रमाणे पुण्यातले लोक चुकुनही गोरखपुरला जात नाहीत. आम्हाला औरंगाबाद, नाशिक व नागपुरच्या गाड्या वाढवून हव्या आहेत. पुणे-लोणावळा व पुणे-दौंड उपनगरीय गाड्यांबाबत विचार केला जावा अशी आमची इच्छा. आमच्या ४२ पिढ्यातील कोणीही पुणे-पटना वा पुणे-भागलपूर अशा गाड्या मागितल्या नव्हत्या. आशा पुढील वेळेस रेल्वेमंत्री बिहारचा नसेल. आणि हो, ममता पण नको!

No comments: