08 January 2007

ULFA kills Biharis! उल्फाचा उत्पात!

उल्फ़ाचा उत्पात!
उल्फांनी बिगर आसामी लोकांवर केलेल्या हल्ल्यांमुळे भयभीत झालेल्या हिंदी भाषिकांनी आसाममधून बाहेर पडण्यास सुरूवात केली. पंधरा-वीस जणांच्या समूह बिहारकडे परतण्यासाठी गुवाहाटी स्थानकावर उभा असल्याचे वृत्त आहे. राज्य प्रशासनाने हे वृत्त नाकारले आहे. दिब्रुगड, तीनसुकीया, सिबसागर या ठिकाणी उल्फांनी घडवून आणलेल्या हिंसाचारात ६४ जण ठार झाले तर चाळीस जण जखमी झाले.

हे सगळं केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे झाले आहे. केंद्र सरकारने भारतातील सर्व राज्यांना समान वागणूक कधीच दिली नाही. बिहार, उत्तर भारत,इशान्येकडील राज्ये मागास राहिली. मुंबई/महाराष्ट्र प्रगत झाली परंतु केंद्राने कधीही येथील भुमिपुत्रांना किंमत दिली नाही. उत्तर भारतीय लोकांच्या big brother attitude मुळे महाराष्ट्रात जिथे पहावे तिथे ही हिंदी लोक येतात आणि धुमाकूळ घालतात.
असो, आसामच्या लोकांना अथवा एकूणच इशान्येकडील लोकांवर जोरजबरद्स्ती करुन काहीही साध्य होणार नाही. त्यांची असंतुष्टता संपवण्यासाठी केंद्राने त्यांच्या भावनांची कदर करायला हवी. भारतीय सैन्याने कलकत्तयात काय गुण उधळले हे आपण पाहिलेच, मग ही लोक मणिपूर मध्ये काय धुमाकूळ घालतील ह्याची कल्पनाच न केलेली बरी. केंद्राच्या टाळक्यात ही गोष्ट येत नाही की मणिपूरी लोक ह्यांची सैन्याला कमी अधिकार द्यावा ही मागणी योग्य तर आहेच पण त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी हे पाऊल उचलले गेले पाहिजे.

No comments: