


आयडीया सारेगमपची अंतिम फेरी २४ फेब्रुवारीला आहे. या सोमवारी झालेला गोंधळ म्हणजे
दुर्दैवी व स्पर्धकांवर अन्याय करणारा होता. प्रेक्षकांच्या मतानुसार अभिजीत कोसंबी बाहेर
जाणार होता पण परिक्षकांनी ''आम्हाला तिघातील कोणीही गेलं तर वाईट वाटेल'' असा
हट्ट धरला आणी अभिजीतला जीवदान मिळाले. हे अत्यंत चुकीचे आहे. जर तुम्हाला ''कोणीही''
गेला तरी दु:ख होणार होतं (खरंतर अभिजीत कोल्हापूरचा असल्यामुळे अवधुतला दु:ख झालंय!)
तर मग प्रेक्षकांना एसएमएस करायला कशाला सांगितल? अभिजीत कोसंबी हा ठीक गातो पण
त्याच्यासाठी नियम बदलणं वेडेपणा आहे. त्याला जर retain केल गेलं आहे तर आनंदी जोशीला
का नाही? Judgesच्या ह्या एकतर्फी निर्णयाचे आम्ही निषेध करतो.
असो. सोमवारी अनघा ढोमसेनी म्हटलेले ''सर्वस्व तुजला वाहूनी माझ्या घरी मी पाहुणी'' हे
गाणं तसेच प्रत्येक स्पर्धकानी म्हटलेली निवडक गाडी झी मराठीच्या साईट वर उपलब्ध आहेत.
http://zeemarathi.com/Saregamapa/songs.aspx महाअंतिमफेरी साठी मंगेश बोरगांवकर
किंवा अनघा ढोमसे पैकी कोणीही जिंकू देत,दोघही चांगले गातात. पण आनंदीजर grand
finaleत असती तर...alas!
No comments:
Post a Comment