काही कारणांमुळे मी आयडिया सारेगमपचा सध्याचा 'सीजन' पूर्णपणे पाहू शकलो नाही, मध्येच काही भाग दृष्टीस पडायचे. हा सीजन मस्तच जमला असेल यात शंका नाही. त्यातल्या त्यात सुनिल बर्वे, सुमित राघवन व सीमा देशमुख यांची गाणी फार चांगली वाटली. मुख्य म्हणजे हा कार्यक्रम मार्गदर्शक व कलाकार-स्पर्धक सर्वांनीच गंभीरपणे घेतला होता व चांगलीच मेहनत केली होती. सीमा देशमुख फारच गोड दिसत होती कार्यक्रमात व तिने म्हटलेले 'माझ्या ????ने सोडलीया दारु' आपले फेवरिट. या कार्यक्रमाचे सर्वात मोठे यश किंवा प्लस पॉईंट असा की नव्या पिढीला मराठी संगीताबद्दल आवड निर्माण होत आहे.
उद्या पुण्यात या कार्यक्रमाचा ग्रॅंड फिनाले अर्थात अंतिम फेरी रंगणार आहे. आशा आहे आधीच्या सारेगमपची अंतिम फेरी जशी मस्त जमली होती तशीच ही देखिल जमेल. अंतिम फेरीत आपले मत तर सुमितलाच आहे. असंच तुलना करत असतानाच मला हिंदी सारेगमपचा फोलपणा दिसून आला. माझ्या मते गजेंद्र सिंह सारेगमपच्या हिंदी वर्जन हास्यास्पद व मेलोड्रामाटिक करण्यात काही कसर सोडत नसतील! तईच गत अंताक्षरीची.एका भाग पाहत होतो तर उगाच हिमेश रेशमिया आशा भोसलेंशी वाद घालत होता, नंतरच्या भागात इस्माईल दरबार अजून कोणाच्या नावाने उखडला होता. स्टारवरच्या वॉईस ऑफ इंडियात अलका वि. अभिजीत वि. बप्पी वि. ललित असा सामना रंगला होता!! आपला कार्यक्रम लोकप्रिय करण्यासाठी हे लोक काय-काय करतील काही नेम नाही!
Showing posts with label Marathi music. Show all posts
Showing posts with label Marathi music. Show all posts
22 June 2007
25 February 2007
सारेगमप महागायक विजेता- अभिजीत कोसंबी Saregamapa winner Abhijeet Kosambi
काल आयडिया सारेगमपची महाअंतिम फेरी दिमाखात झाली. फक्त निकाल काय तो धक्कादायक होता. मंगेश बोरगांवकर किंवा अनघा ढोमसेंपैकी कोणी जिंकावे अशी माझी इच्छा होती पण जिंकला अभिजीत कोसंबी! खरं सांगायचं तर हा अभिजीत मला इतका चांगला गायक अजिबात वाटत नाही. महाअंतिम फेरीपर्यंत मजल मारली ते ठीक आहे पण अनघा व मंगेश ह्यांचं गाणं अत्यंत कानांना मधुर वाटतं. मला संगीतातले काही समजत नाही पण अभिजीतला 'मल्हार वारी' आणि सावरखेड-एक गाव मधले 'हे गाव माझे' या उत्तम गाण्यांची वाट लावताना मी ऐकले आहे! काल बाद झालेल्या स्पर्धकांनी सोहळ्याच्या सुरुवातीला म्हटलेले 'तु चाल पुडं तुला रं गड्या भीती कुनाची' हे गाणं सर्वात उत्तम होते.
असो, कालच्या सोहळ्यातील सर्वात चिड आणणारी गोष्ट म्हणजे जेव्हा अभिजीतला महागायक ची ट्रॉफी दिली गेली तेव्हा अशी घोषणा करण्यात आली की त्याला हिंदी सारेगमप मध्ये (म्हणजे Hero Honda Saregamapa!) 'डायरेक्ट' प्रवेश मिळाला आहे. हा म्हणजे मूर्खपणाचा कळस आहे. येथे विजयी होणारा स्पर्धक तावून-सुलाखून निघाला आहे. त्याने सारेगमपची परीक्षा पास केली आहे त्याला पुन्हा हिंदीतील त्याच स्पर्धेत का बसवता? काय हिंदी कार्यक्रमाचा दर्जा मराठीपेक्षा जास्त आहे? का हिंदी सारेगमप मध्ये भाग घेऊन त्याचे हात आकाशाला टेकणार आहेत? त्याला जर nationwide exposure द्यायचंय तर त्याला हिंदी अल्बम ऑफर करा ना. कमीत कमी मराठी अल्बम काढायलाच हवा. पण इथेच मराठी माणसांचं चुकतं! नेहमी हिंदीकडे का पाहता? हिंदी सारेगमप म्हणजे अत्यंत हास्यास्पद कार्यक्रम आहे. घडवून आणलेल्या controversies, परिक्षकांमधील फालतू व बाष्फळ वाद इत्यादीं मुळे TRP वाढवणे इतकाचं यांचा उद्योग आहे. सारेगमप, लिटील चॅम्प्स आणि नंतर एक मै और एक तु इत्यादी रटाळ कार्यक्रमात भाग घेणं हे महागायकाला नक्कीच शोभणारं नाही.मराठी दहावी पास झालेल्या मुलाला परत हिंदीच्या पहिल्या इयत्तेत का बसवता?
असो, कालच्या सोहळ्यातील सर्वात चिड आणणारी गोष्ट म्हणजे जेव्हा अभिजीतला महागायक ची ट्रॉफी दिली गेली तेव्हा अशी घोषणा करण्यात आली की त्याला हिंदी सारेगमप मध्ये (म्हणजे Hero Honda Saregamapa!) 'डायरेक्ट' प्रवेश मिळाला आहे. हा म्हणजे मूर्खपणाचा कळस आहे. येथे विजयी होणारा स्पर्धक तावून-सुलाखून निघाला आहे. त्याने सारेगमपची परीक्षा पास केली आहे त्याला पुन्हा हिंदीतील त्याच स्पर्धेत का बसवता? काय हिंदी कार्यक्रमाचा दर्जा मराठीपेक्षा जास्त आहे? का हिंदी सारेगमप मध्ये भाग घेऊन त्याचे हात आकाशाला टेकणार आहेत? त्याला जर nationwide exposure द्यायचंय तर त्याला हिंदी अल्बम ऑफर करा ना. कमीत कमी मराठी अल्बम काढायलाच हवा. पण इथेच मराठी माणसांचं चुकतं! नेहमी हिंदीकडे का पाहता? हिंदी सारेगमप म्हणजे अत्यंत हास्यास्पद कार्यक्रम आहे. घडवून आणलेल्या controversies, परिक्षकांमधील फालतू व बाष्फळ वाद इत्यादीं मुळे TRP वाढवणे इतकाचं यांचा उद्योग आहे. सारेगमप, लिटील चॅम्प्स आणि नंतर एक मै और एक तु इत्यादी रटाळ कार्यक्रमात भाग घेणं हे महागायकाला नक्कीच शोभणारं नाही.मराठी दहावी पास झालेल्या मुलाला परत हिंदीच्या पहिल्या इयत्तेत का बसवता?
15 February 2007
सारेगमप ची महाअंतिम फेरी Saregamapa's grand finale



आयडीया सारेगमपची अंतिम फेरी २४ फेब्रुवारीला आहे. या सोमवारी झालेला गोंधळ म्हणजे
दुर्दैवी व स्पर्धकांवर अन्याय करणारा होता. प्रेक्षकांच्या मतानुसार अभिजीत कोसंबी बाहेर
जाणार होता पण परिक्षकांनी ''आम्हाला तिघातील कोणीही गेलं तर वाईट वाटेल'' असा
हट्ट धरला आणी अभिजीतला जीवदान मिळाले. हे अत्यंत चुकीचे आहे. जर तुम्हाला ''कोणीही''
गेला तरी दु:ख होणार होतं (खरंतर अभिजीत कोल्हापूरचा असल्यामुळे अवधुतला दु:ख झालंय!)
तर मग प्रेक्षकांना एसएमएस करायला कशाला सांगितल? अभिजीत कोसंबी हा ठीक गातो पण
त्याच्यासाठी नियम बदलणं वेडेपणा आहे. त्याला जर retain केल गेलं आहे तर आनंदी जोशीला
का नाही? Judgesच्या ह्या एकतर्फी निर्णयाचे आम्ही निषेध करतो.
असो. सोमवारी अनघा ढोमसेनी म्हटलेले ''सर्वस्व तुजला वाहूनी माझ्या घरी मी पाहुणी'' हे
गाणं तसेच प्रत्येक स्पर्धकानी म्हटलेली निवडक गाडी झी मराठीच्या साईट वर उपलब्ध आहेत.
http://zeemarathi.com/Saregamapa/songs.aspx महाअंतिमफेरी साठी मंगेश बोरगांवकर
किंवा अनघा ढोमसे पैकी कोणीही जिंकू देत,दोघही चांगले गातात. पण आनंदीजर grand
finaleत असती तर...alas!
11 January 2007
सा रे ग म प Sa re ga ma pa

परवा झी मराठी वरचे सारेगमप पाहिले. आमच्या घरी ई.टी.वी चे जास्त प्रस्थ असल्यामुळे मला झी मराठीवरच्या कार्यक्रमांची जास्त माहिती नव्हती. ३१ डिसेंबरच्या एका कार्यक्रमात सारेगमपची मंडळी औरंगाबादेत गात होती. (अगं बाई अरेच्चा मधील 'मल्हार वारी' या झकास गाण्याची वाट लावत होती!) पण नंतरची दादा कोंडक्यांची गाणी ठीक म्हटली. तेव्हापासून मला सारेगमप माहित झाले आणि मराठीत reality show चालू असल्याचे समाधान वाटले.
परवा प्रथमच पूर्ण भाग पाहिला. नव्या गाण्यांचा विशेष भाग होता. महेश मांजरेकर (भयानक चेहरा आणि तोडकं मराठी बोलत होता. हिंदीत गेल्यावर यांचे चालढंग, कपडे आणि केसं सगळंच बदलत!) विशेष अतिथी होता. बहुतेक स्पर्धकांनी चांगली गाणी म्हटली. BTW माझी फ़ेवरेट मुंबईची आनंदी जोशी आहे. तिचा चेहरा आणि आवाज खूप आवडला! आनंदी ने अवधूत गुप्ते याचे गाणे म्हटले. मी कधी ऐकले नव्हते पण हा माणूस चांगला संगीतकार आहे. इतर काही स्पर्धकांनी सुध्दा त्याची गाणी म्हटली. कोल्हापूरच्या अभिजीत कोसंबीने 'वाऱ्यावरती रंग पसरले..' ह्या सुंदर गाण्याची वाट लावली.
पण सगळ्यात कमाल केली ते अनघा आणी मंगेश बोरगावकरानी. अनघाने कोणतं गांण म्हटल ते आठवत नाही पण मंगेशनी श्रीरंग गोडबोले लिखीत आणि अजय-अतुलचे संगीत असलेले 'महाराष्ट्र-गीत' म्हटले. ते त्यानी इतके जोशात गायले की अवधुतने म्हटल्याप्रमाणे अंगावर काटा उभा राहिला. सिंगर ऑफ द डे चा मान अर्थातच त्याला मिळाला. मी आता सारेगमपचे पुन:प्रक्षेपण कधी होतंय त्यावर नजर ठेवुन आहे. मला त्याचे गाणे रेकॉर्ड करायचं आहे. असो तुम्ही वोट देत आहात ना? या वेळेसचे माझे मत आनंदीला दिलं (आयडीया कंपनी चोर आहे,तीन रुपये पडतात एका smsला!) म्हणून मंगेशला वोट bsnl वरुन देणार आहे!
Subscribe to:
Posts (Atom)