06 June 2008
कुमार केतकरांच्या घरावर हल्ला! Attack on editor Kumar Ketkar's house
कुमार केतकर हे मोठे पत्रकार आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील ज्या तक्रारी व जे प्रश्न अग्रलेखात मांडले त्याविषयी दुमत असण्याचे कारण नाही. सरकारचा कारभार देखिल त्यांना जोडे मारण्याच्याच लायकीचा आहे! परंतु कुमार केतकर यांनी अग्रलेखात छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अप्रत्यक्षपणे टीका केली आहे; त्यांचा अवमान केला आहे. त्यांच्या अग्रलेखातील काही झोंबणारी आक्षेपार्ह विधाने येथे देत आहोत-
Such a monument was the necessity of the hour, to announce to the world that Maharashtra is a state of warriors and patriots and the symbol of that spirit is Shivaji Maharaj. That is why Victoria Terminus was renamed as Chhatrapati Shivaji Terminus (CST).
Instantly after the renaming, trains began to run on time, crowds could be managed, corruption
disappeared, the local train journey became comfortable..Could this have happened without the
glory of the name of Shivaji Maharaj that adorns the station now?
Both are now renamed as Chhatrapati Shivaji Maharaj airport terminal. Like a magic wand, the airports became efficient, employees began to behave courteously, flights were punctual, take-offs and landings perfect, no more hovering in the sky looking for landing spots. Who would have believed this if it had not actually been experienced by the people? Was it possible without the miracle called Shivaji Maharaj?
Naturally, the government felt that having solved all the problems of the people, what remains to be done is to tell the whole world of the greatness of Shivaji. Along with the museum, there will be shopping malls, selling T-shirts with Shivaji’s painting. There will be Shivaji key chains, Shivaji gift items, including cutlery.
Could there have been a greater tribute to the image, symbol and glory of Shivaji Maharaj than such a statue, standing in the middle of the sea, warning all the terrorists to keep off Mumbai, and to keep away from India because the people of Maharashtra protect and promote the idea of a Great India?
(मूळ मराठी अग्रलेखाचा अनुवाद केतकरांनीच केला आहे)
http://www.expressindia.com/latest-news/--All-the-problems-have-been-solved--Now-let-s-build-a-statue--/319496/
मुंबईच्या परप्रांतियांप्रमाणे केतकरांना शिवाजी महाराजांचे नाव रेल्वे स्थानक, विमानतळ यांना दिल्याचे आवडलेले दिसत नाही. हे खरंच त्या विमानतळाचे/रेल्वे स्थानकाचे नाव बदलल्याने कारभार बदलत नाही, पण त्यामागील symbolism प्रतिकात्मकता त्यांनी का पाहू नये? स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणे चलनांवर इंग्रज राजांची चित्रे/मुद्रा होत्या. आता म.गांधीचे चित्र नोटांवर लावल्याने काय भारताची अर्थव्यवस्था सुधारली का चो-या/दरोडे थांबले? त्यांचा अग्रलेख वाचून परप्रांतियांना भलतेच आनंदाचे भरते आलेले दिसते! (वेबपेज वरील वाचकांचे comments पहावीत)
केतकरांसारख्या ज्येष्ठ पत्रकाराने असला बेजबाबदार अग्रलेख लिहीणे चुकीचे आहे. मागे एकदा त्यांनी ब्राम्हण समाजाच्या मेळाव्यात काहीतरी वादग्रस्त बोलून उपस्थितांकडून शिव्याशाप घेतले होते. या अग्रलेखाबद्दल केतकरांनी (छ्त्रपतींची अवहेलना केल्याबद्दल, सरकारवर टीका केल्याबद्दल नव्हे) मराठी माणसांची माफी मागायला हवी.
केतकरांच्या घरावरील हल्ला कदाचीत भ्याड, लोकशाहीची मुल्ये पायदळी तुडवणारा वैगरे असेल पण सरकारच्या कैवा-यांनी केलेला हा हल्ला म्हणजे 'पाहुण्याच्या काठीने साप मेला' असा आहे!
23 June 2007
मराठी चित्रपट पहायचे कुठे? Where to catch Marathi movies?
ग्राहक हा राजा असतो. चित्रपट-उद्योगाच्या बाबतीत देखिल हे खरं आहे. मराठी चित्रपट चालत नाहीत याचं खापर प्रेक्षकांवर फोडणे गैर आहे. भावनीक आवाहन केले ते ठीक पण मराठी चित्रपट निर्मात्यांना हे सांगावंस वाटतं की तुम्ही चित्रपट तयार केला आहे व तो कुठे दाखवणार आहात याचीच माहिती जर आम्हाला नसेल तर याचा दोष कुणाचा? मराठी वाहिन्यांची भरभराट होत आहे (त्यांना कसे प्रेक्षक मिळतात?) व त्यामुळे 'झबरदस्त' सारख्या चित्रपटांची माहिती होते (या चित्रपटाचा ट्रेलर अत्यंत फालतू बनवला आहे!) पण जर जवळपासच्या कोणत्याच चित्रपटगृहात तो लागला नसेल तर आम्ही कसा बघणार? मराठी चित्रपटांचा लेटेस्ट प्रॉब्लेम म्हणजे चित्रपटगृह मिळत नाहीत हा आहे. आणी हा प्रॉब्लेम प्रेक्षकांनी नाही तर निर्माते व महाराष्ट्र-सरकार यांनी सोडवायचा आहे. जे लोक पुणे शहरात,कोथरुड परिसरात राहतात ते आवर्जून चित्रपट पहायला जातात. प्रभात व सिटीप्राईड मध्ये मराठी चित्रपट चांगला गल्ला कमावतात. याचाच अर्थ की मराठी प्रेक्षक चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पहावयास तयार आहे पण तो घरच्या जवळ तर लागला पाहिजे ना? उपनगरात राहणारे प्रेक्षक केवळ चित्रपट पहायला शहारात येणार नाहीत. जे थेटर-मल्टिप्लेक्स चालक मराठी चित्रपट दाखवित नाहीत त्यांच्यावर कारवाई करा. आज पुण्यात हिंदी-इंग्रजी सोबत एकेक तमिळ व कन्नड चित्रपट देखिल लागलेत. पैकी शिवाजी (तमिळ) व एक कन्नड चित्रपटास झबरदस्त, एवढंस आभाळ, मु.पो.लंडन या प्रमुख मराठी चित्रपटांपेक्षा जास्त खेळ व थेटर मिळाले आहेत!! ही विषादाची गोष्ट आहे व मराठी चित्रपट महामंडळ व महाराष्ट्र सरकारच यावर काही उपाय करु शकतात.
22 June 2007
सारेगमपची अंतिम फेरी पुण्यात Saregamapa grand finale in Pune
उद्या पुण्यात या कार्यक्रमाचा ग्रॅंड फिनाले अर्थात अंतिम फेरी रंगणार आहे. आशा आहे आधीच्या सारेगमपची अंतिम फेरी जशी मस्त जमली होती तशीच ही देखिल जमेल. अंतिम फेरीत आपले मत तर सुमितलाच आहे. असंच तुलना करत असतानाच मला हिंदी सारेगमपचा फोलपणा दिसून आला. माझ्या मते गजेंद्र सिंह सारेगमपच्या हिंदी वर्जन हास्यास्पद व मेलोड्रामाटिक करण्यात काही कसर सोडत नसतील! तईच गत अंताक्षरीची.एका भाग पाहत होतो तर उगाच हिमेश रेशमिया आशा भोसलेंशी वाद घालत होता, नंतरच्या भागात इस्माईल दरबार अजून कोणाच्या नावाने उखडला होता. स्टारवरच्या वॉईस ऑफ इंडियात अलका वि. अभिजीत वि. बप्पी वि. ललित असा सामना रंगला होता!! आपला कार्यक्रम लोकप्रिय करण्यासाठी हे लोक काय-काय करतील काही नेम नाही!
10 March 2007
ब्लॉगर मध्ये थेट मराठीत टंकलेखन करा- Blogger allows to type directly in Marathi
ब्लॉगर मध्ये लेख/पोस्ट लिहिताना आता तुम्हाला बरहा इत्यादी सॉफ्टवेयरची गरज लागणार नाही. ब्लॉगर मध्ये तुम्ही थेट मराठीत लिहू शकता. अधिक माहिती वरील लिंक वर उपलब्ध आहे.
09 March 2007
राज ठाकरे बिहारींना 'चापट' देणार! Raj Thackeray 'slaps' Biharis!
लागल्यावर राज ठाकरे यांना उशिरा का होईना पण शहाणपण सुचले आहे. ते युपी-बिहारी
लोकांना कॉंग्रेस-समाजवादी सारख्या पार्ट्या आपल्याशा वाटतात,ते लोक कदापी
शिवसेना-मनसेला मते देणार नाहीत. का सारखे त्यांच्या मतांसाठी भीक मागता? मराठी
माणसाने 'दणका' दिल्यावर राज यांनी 'युटर्न' घेतला हे बरे झाले. सेनेला स्पर्धा हवीच
नाहीतर हे लोक संजय निरुपम, राम जेठमलानी, प्रितीश नंदी अशा दगडांना पक्षातर्फे संसदेत
पाठवतात. राज ठाकरे यांनी हा मुद्दाच चालवला पाहिजे,किंबहुना ते जे बोलतात ते करुन
दाखवावे अशी मराठी लोकांची त्यांना कळकळीची विनंती आहे.
सहारा समय नामक हिंदी वाहिनी वर जैसवाल, रविशंकर प्रसाद आणि संजय निरुपम याची
'प्रतिक्रिया' विचारली गेली. त्यात संजय निरुपम (लखनऊहून- पाहून आनंद झाला,तेथेच रहा
कायमचा!) असा बोलला की त्यांनी एक बोट दाखविले तर आम्ही 'पाच बोटांनी' उत्तर देऊ!!
युपी-बिहारींची पाच बोटांची असलेले नेते आम्हांस ठाऊक आहेच पण हे नालायक लोक इतके माजले
आहेत की राष्ट्रीय वाहिनीवरुन (आमच्या घरात येऊन) आम्हालाच अक्कल शिकवतात. संजय
निरुपमच्या वक्तव्याने राज ठाकरे जे बोलले ते योग्यच होते याची खात्री पटली. उद्या म्हणे
लालू यादव विलासरावांशी बोलणार आहे.लालूला म्हणावे directly सोनियांशीच बोल ना!
कॉंग्रेसच्या मुख्यमंत्री दिल्लीच्या आन्येबाहेर नाहीत...
Raj's remark on Biharis sparks off controversy
Posted at Friday, 09 March 2007 19:03 IST
Mumbai, March 9: Maharashtra Navnirman Sena (MNS) chief Raj Thackeray today sparked off controversy by making statement over the increasing number of non-Maharashtrians in the state, Sahara Samay sources said.
Calling on Marathi-speakers to introspect why immigration to this city has increased, Raj Thackeray today said his party will not compromise on Maharashtra's culture and pride.
Addressing a packed gathering of MNS workers on the occasion of his party completing a year, Raj made an impassioned plea to Marathi people by saying, "We must introspect on who is to blamed for this state of affairs.
"After all, it is Maharashtrians who are in top posts in the city and in spite of that, slums have sprung up. It is Maharashtrians who are responsible for this because we have allowed it to happen. We have to introspect on this."
Raj also said, "We cannot progress by hating another community. But if somebody tries to trouble Maharashtrians while living in Mumbai, that will also not be tolerated.
"We will not compromise on Marathi pride and Marathi culture."
Reacting on the statement, Railway Minister and RJD chief Lalu Prasad Yadav condemned his remark on Biharis and said that he will discuss the issue with the Chief Minister tomorrow.
06 March 2007
मी मराठी सुरु झाली, Mi Marathi started!
काल अधिकारी ब्रदर्सची 'मी मराठी' वाहिनी सुरु झाली. मागील १०-१५ दिवसांत दोन नव्या वाहिन्या सुरु झाल्या आहेत, झी २४ तास आणी मी मराठी, त्यामुळे खूप आनंद झाला. मी मराठीचा एकूण थाट भव्य व आकर्षक आहे. मी काल अनेक मालिका पाहिल्या. पैकी भरत जाधवची 'दोन फूल एक डाऊटफूल' (यात त्याच्या दुसरी गुजराती बायको मराठी छान बोलते!- अधुरी एक कहाणी मधील एक रडरड रडणारी बया येथे चांगलं काम करतीये!), दावत, दिलखूलास, दोष ना कुणाचा इ. मालिका चांगल्या वाटत आहेत. त्याच बरोबर अधिकारी ब्रदर्सनी 'रटाळ' सह्याद्री-दुरदर्शन साठी बनवलेल्या 'रटाळ' मालिका पुन्हा आमचा छळ करायला दाखवत आहेत. दामिनी, बंदिनी आणखी काही-बाही मालिका पुन्हा बोर करायला उपटल्या आहेत. असो, पण ई.टी.वी मराठी पे-चॅनल झाल्यामुळे आमच्या केबल वाल्यानी बंद केल्यामुळे महिलावर्ग चांगलाच चिडला आहे! वर पठ्ठयाने झी २४ तास सुरु केला नाहीये.