23 January 2009

कन्नडीगांनो उत्तर द्या! Answer this Kannadigas!

बेळगाव सीमाभाग पुन्हा उफाळून आलाय. दोन्ही राज्यात तोडफोड- जाळपोळीस ऊत आलाय. असं म्हणतात की आपण आपले शेजारी निवडू शकत नाही. कर्नाटकचा शेजार खरोखर अत्यंत तापदायक असा आहे. कर्नाटकचा स्वभावच मुळी उर्मट, बालिश, दुटप्पी व हेकेखोर आहे. महाराष्ट्रासोबत इतर राज्यांनाही याचा फटका बसला आहे. महाराष्ट्रातील लोकांना सीमाप्रश्नाविषयी अधिक माहिती करुन देणे व कर्नाटकचा खरा चेहरा लोकांसमोर आणणे हाच या लेखाचा हेतू आहे. ज्या बेळगावावर हे कन्नडिग आमचा म्हणून आरडाओरड करतात त्यांना खालील प्रश्नाची उत्तरे द्यावीत-

* बेळगाव हा मराठीबहुल भाग आहे. आजही तेथील तीन-चतुर्थांश लोक मराठी भाषा बोलतात. भारतातील प्रांतरचना जर भाषावार झाली आहे तर बेळगाव हे नैसर्गीक न्यायाने मराठी बोलणा-या महाराष्ट्रात यायला हवे. यावर काही वाद होवूच कसा शकतो?

* महाजन आयोग अंतिम असल्याची पोपटपंची सर्व कर्नाटकी मुख्यमंत्री करीत असतात. महाजन आयोग हा लवादाचा वा कोणत्याही न्यायालयाचा निर्णय नसून तो महाराष्ट्राला वा केंद्राला बंधनकारक नाही. केरळ सरकारनेही महाजन आयोग कच-याच्या टोपलीत घातलाय! फक्त आपल्या बाजूने गेला म्हणून महाजन आयोगचे तुणतुणे कर्नाटक वाजवीत आला आहे.
त्याच बरोबर हे लक्षात घ्यायला पाहिजे की कावेरी जलविवादाबाबतचा लवादाचा अहवाल कर्नाटकने अमान्य केला आहे. या दुटप्पीपणाला काय म्हणावे?

* बेळगाव आमचेच अशी वल्गना करणारे कर्नाटक तेथील मराठी बहुसंख्यांकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करते पण असणारे केरळ राज्यातील कासारगोड बाबत मात्र ते कर्नाटकात यायला हवे (कारण तेथे कन्नड भाषीक बहुसंख्य आहेत) असा गळा काढते! मला हे पण हवे आणि ते पण असा बालिश हट्ट कर्नाटकचा आहे. दुर्दैवाने कर्नाटक सरकारची ही निर्लज्ज भुमिका कन्नड जनता खपवून घेते.

* काही महामूर्ख लोक तर बेळगावातील मराठी जनता परप्रांतिय (migrants) आहेत व बेळगावातच काय महाराष्ट्रातील अनेक गावे आधी कन्नड असल्याचा जावईशोध लावतात! तसाच न्याय लावायचा झाला तर अर्ध्याहून अधिक कर्नाटक मराठ्यांच्या ताब्यात होते व कर्नाटकच काय पण मराठी झेंडा अटकेपार गेला आहे, तर आम्ही अफगाणिस्तानाचे विलिनीकरण महाराष्ट्रात करावे काय?

* कर्नाटकातील जनतेची तेथील नेतेमंडळी इतर राज्यांबद्दल तिरस्कार पसरवून दिशाभूल करत आहेत. महाराष्ट्रासोबत बेळगाव विवाद, तामिळनाडूसोबत कावेरी जलविवाद, केरळसोबत कासारगोड बाबतचा विवाद आहेच. त्यात भर म्हणून सध्याच्या बेळगाव अधिवेशनात आंध्राशी नवा सीमावाद ही कर्नाटकी नेत्यांची टोळी उकरुन काढत आहे!

आम्ही महाराष्ट्र सरकारच्या बोटचेपीपणाबद्दल निषेध करीत आहोत . केंद्र सरकारने कर्नाटकला योग्य ती अद्दल घडवण्याची गरज आहे.



Belgaon (Belgaum) border issue has come into limelight yet again. Both states are witnessing widespread protests . It is said that we can't choose our neighbours! Maharashtra's neighbouring state, Karnataka is indeed very troublesome. Karnataka has always been arrogant, childish and hypocrite in its dealings with its neighbours including Maharashtra. This post is meant to expose real face of Karnataka and educate Marathi people about this highly emotional Belgaum issue. Kannadigas which are crying out 'Belgaum is our indivisible part' on rooftops should stop the rhetoric and answer following questions-

* Belgaon (Belgaum) has always been a Marathi-majority area. Even today three-fourths of Belgaonkars speak Marathi. If India's states are formed according to lingual composition, Belgaum should be in Maharashtra according to natural justice. Is there any element of contention here?

* All Karnatakan chief ministers speak of 'Mahajan report' of being final. Mahajan report is not the verdict of any court or tribunal.This report is not accepted, not implemented and not mandatory to Maharashtra or Centre. Even Kerala has thrown the report to the place it deserves, dustbin. Karnataka is fond of Mahajan report only because its findings favoured them. Intrestingly Karnataka has rejected the verdict of Cauvery tribunal. These are Karnataka's double-standards.

* Karnataka ignores the Marathi majority in Belgaum while claiming it as their own however it also asks for Kasargod (on the grounds that it has Kannada majority!) Karnataka wants to have cake and it eat it too! This childish and shameless attitude of Karnataka government is unfortunately endorsed by its people.

* Some Kannada extrimists have invented new way to justify Belgaum's detention by claiming that Marathis are migrants in Belgaum. And that half of Maharashtra town names are Kannada. Fine, but how about the fact that Marathas have ruled more than half of Karnataka and their reign extended till Atak in Afghanistan. Should we seek merger of Afghanistan?

* Kannadigas should understand that their leaders are fooling them by creating misunderstandings and hatred towards neighbouring states. Belgaum dispute with Maharashtra, Cauvery water dispute with Tamil Nadu, Kasargod issue with Kerala are unnecessarily being raked up and intensified. In the ongoing Belgaon assembly session, this gang of Karnataka leaders have discovered yet another border dispute with neighbouring Andhra to fool Kannadigas.

We condemn Maharashtra government's spineless response to Belgaon dispute. Centre should take appropriate action against warring Karnataka.

पुनारंभ restart

नमस्कार! जवळजवळ एक वर्ष बंद असलेला हा ब्लॉग पुन्हा सुरु करीत आहोत. ब्लॉग सुप्तावस्थेत असतानाही आम्हाला अनेक कॉमेंट्स व ईमेल मिळाले. त्यात प्रतिक्रिया, प्रश्न विचारले गेले. विशेषत: झी मराठी वरील आयडिया सारेगमप या कार्यक्रमाविषयी. असो, या कार्यक्रमाबरोबरच मराठी माणसांच्या अनेक जिव्हाळ्याच्या विषयासोबत आम्ही पुन्हा येत आहोत! असाच लोभ असावा ही विनंती!

Namaskar. We are re-starting this blog which was off since a year. We have received many questions and feedback, especially about Zee Marathi's Idea Saregamapa program. We shall be discussing this and many other issues close to Marathi people. Keep visiting!

06 June 2008

कुमार केतकरांच्या घरावर हल्ला! Attack on editor Kumar Ketkar's house

कुमार केतकर यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यामुळे त्यांच्याविषयी व एकूणच 'पत्रकारजाती'वर सहानुभूतीचा वर्षाव होत आहे. 'लोकसत्ता' मधील अग्रलेख ज्यांनी वाचला असेल त्यांच्या भुवया नक्कीच उंचावल्या असतील. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मुंबईत उभारला जाणार असल्याची सरकारने घोषणा केली आणि ती पुढील निवडणुकीसाठी होती हे अनेकांना वाटले. या प्रकल्पावर खूप खर्च होत आहे हे सुध्दा सर्वच मान्य करतील. परंतु सामान्यत: अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ लिबर्टी च्या धर्तीवर उभारल्या जाणा-या या प्रकल्पामुळे मराठी मने सुखावली हे नक्की.

कुमार केतकर हे मोठे पत्रकार आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील ज्या तक्रारी व जे प्रश्न अग्रलेखात मांडले त्याविषयी दुमत असण्याचे कारण नाही. सरकारचा कारभार देखिल त्यांना जोडे मारण्याच्याच लायकीचा आहे! परंतु कुमार केतकर यांनी अग्रलेखात छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अप्रत्यक्षपणे टीका केली आहे; त्यांचा अवमान केला आहे. त्यांच्या अग्रलेखातील काही झोंबणारी आक्षेपार्ह विधाने येथे देत आहोत-

Such a monument was the necessity of the hour, to announce to the world that Maharashtra is a state of warriors and patriots and the symbol of that spirit is Shivaji Maharaj. That is why Victoria Terminus was renamed as Chhatrapati Shivaji Terminus (CST).

Instantly after the renaming, trains began to run on time, crowds could be managed, corruption
disappeared, the local train journey became comfortable..Could this have happened without the
glory of the name of Shivaji Maharaj that adorns the station now?

Both are now renamed as Chhatrapati Shivaji Maharaj airport terminal. Like a magic wand, the airports became efficient, employees began to behave courteously, flights were punctual, take-offs and landings perfect, no more hovering in the sky looking for landing spots. Who would have believed this if it had not actually been experienced by the people? Was it possible without the miracle called Shivaji Maharaj?

Naturally, the government felt that having solved all the problems of the people, what remains to be done is to tell the whole world of the greatness of Shivaji. Along with the museum, there will be shopping malls, selling T-shirts with Shivaji’s painting. There will be Shivaji key chains, Shivaji gift items, including cutlery.

Could there have been a greater tribute to the image, symbol and glory of Shivaji Maharaj than such a statue, standing in the middle of the sea, warning all the terrorists to keep off Mumbai, and to keep away from India because the people of Maharashtra protect and promote the idea of a Great India?
(मूळ मराठी अग्रलेखाचा अनुवाद केतकरांनीच केला आहे)

http://www.expressindia.com/latest-news/--All-the-problems-have-been-solved--Now-let-s-build-a-statue--/319496/

मुंबईच्या परप्रांतियांप्रमाणे केतकरांना शिवाजी महाराजांचे नाव रेल्वे स्थानक, विमानतळ यांना दिल्याचे आवडलेले दिसत नाही. हे खरंच त्या विमानतळाचे/रेल्वे स्थानकाचे नाव बदलल्याने कारभार बदलत नाही, पण त्यामागील symbolism प्रतिकात्मकता त्यांनी का पाहू नये? स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणे चलनांवर इंग्रज राजांची चित्रे/मुद्रा होत्या. आता म.गांधीचे चित्र नोटांवर लावल्याने काय भारताची अर्थव्यवस्था सुधारली का चो-या/दरोडे थांबले? त्यांचा अग्रलेख वाचून परप्रांतियांना भलतेच आनंदाचे भरते आलेले दिसते! (वेबपेज वरील वाचकांचे comments पहावीत)

केतकरांसारख्या ज्येष्ठ पत्रकाराने असला बेजबाबदार अग्रलेख लिहीणे चुकीचे आहे. मागे एकदा त्यांनी ब्राम्हण समाजाच्या मेळाव्यात काहीतरी वादग्रस्त बोलून उपस्थितांकडून शिव्याशाप घेतले होते. या अग्रलेखाबद्दल केतकरांनी (छ्त्रपतींची अवहेलना केल्याबद्दल, सरकारवर टीका केल्याबद्दल नव्हे) मराठी माणसांची माफी मागायला हवी.

केतकरांच्या घरावरील हल्ला कदाचीत भ्याड, लोकशाहीची मुल्ये पायदळी तुडवणारा वैगरे असेल पण सरकारच्या कैवा-यांनी केलेला हा हल्ला म्हणजे 'पाहुण्याच्या काठीने साप मेला' असा आहे!

23 June 2007

मराठी चित्रपट पहायचे कुठे? Where to catch Marathi movies?

नुकतंच पुण्याला एक मराठी चित्रपट विषयक कार्यक्रम झाला होता. तेथे मराठी लोकांना चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पहा असे आवाहन केले गेले. श्वास नंतर मराठी चित्रपट, संगीत यांना चांगले दिवस आलेत हे नक्की पण बहुतेक रसिक चित्रपट डीवीडी/सीडी वर पाहणे पसंत करतात. मीही त्यातला एक. मला विशेषत: नवी मराठी गाणी अत्यंत आवडतात.

ग्राहक हा राजा असतो. चित्रपट-उद्योगाच्या बाबतीत देखिल हे खरं आहे. मराठी चित्रपट चालत नाहीत याचं खापर प्रेक्षकांवर फोडणे गैर आहे. भावनीक आवाहन केले ते ठीक पण मराठी चित्रपट निर्मात्यांना हे सांगावंस वाटतं की तुम्ही चित्रपट तयार केला आहे व तो कुठे दाखवणार आहात याचीच माहिती जर आम्हाला नसेल तर याचा दोष कुणाचा? मराठी वाहिन्यांची भरभराट होत आहे (त्यांना कसे प्रेक्षक मिळतात?) व त्यामुळे 'झबरदस्त' सारख्या चित्रपटांची माहिती होते (या चित्रपटाचा ट्रेलर अत्यंत फालतू बनवला आहे!) पण जर जवळपासच्या कोणत्याच चित्रपटगृहात तो लागला नसेल तर आम्ही कसा बघणार? मराठी चित्रपटांचा लेटेस्ट प्रॉब्लेम म्हणजे चित्रपटगृह मिळत नाहीत हा आहे. आणी हा प्रॉब्लेम प्रेक्षकांनी नाही तर निर्माते व महाराष्ट्र-सरकार यांनी सोडवायचा आहे. जे लोक पुणे शहरात,कोथरुड परिसरात राहतात ते आवर्जून चित्रपट पहायला जातात. प्रभात व सिटीप्राईड मध्ये मराठी चित्रपट चांगला गल्ला कमावतात. याचाच अर्थ की मराठी प्रेक्षक चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पहावयास तयार आहे पण तो घरच्या जवळ तर लागला पाहिजे ना? उपनगरात राहणारे प्रेक्षक केवळ चित्रपट पहायला शहारात येणार नाहीत. जे थेटर-मल्टिप्लेक्स चालक मराठी चित्रपट दाखवित नाहीत त्यांच्यावर कारवाई करा. आज पुण्यात हिंदी-इंग्रजी सोबत एकेक तमिळ व कन्नड चित्रपट देखिल लागलेत. पैकी शिवाजी (तमिळ) व एक कन्नड चित्रपटास झबरदस्त, एवढंस आभाळ, मु.पो.लंडन या प्रमुख मराठी चित्रपटांपेक्षा जास्त खेळ व थेटर मिळाले आहेत!! ही विषादाची गोष्ट आहे व मराठी चित्रपट महामंडळ व महाराष्ट्र सरकारच यावर काही उपाय करु शकतात.

22 June 2007

सारेगमपची अंतिम फेरी पुण्यात Saregamapa grand finale in Pune

काही कारणांमुळे मी आयडिया सारेगमपचा सध्याचा 'सीजन' पूर्णपणे पाहू शकलो नाही, मध्येच काही भाग दृष्टीस पडायचे. हा सीजन मस्तच जमला असेल यात शंका नाही. त्यातल्या त्यात सुनिल बर्वे, सुमित राघवन व सीमा देशमुख यांची गाणी फार चांगली वाटली. मुख्य म्हणजे हा कार्यक्रम मार्गदर्शक व कलाकार-स्पर्धक सर्वांनीच गंभीरपणे घेतला होता व चांगलीच मेहनत केली होती. सीमा देशमुख फारच गोड दिसत होती कार्यक्रमात व तिने म्हटलेले 'माझ्या ????ने सोडलीया दारु' आपले फेवरिट. या कार्यक्रमाचे सर्वात मोठे यश किंवा प्लस पॉईंट असा की नव्या पिढीला मराठी संगीताबद्दल आवड निर्माण होत आहे.

उद्या पुण्यात या कार्यक्रमाचा ग्रॅंड फिनाले अर्थात अंतिम फेरी रंगणार आहे. आशा आहे आधीच्या सारेगमपची अंतिम फेरी जशी मस्त जमली होती तशीच ही देखिल जमेल. अंतिम फेरीत आपले मत तर सुमितलाच आहे. असंच तुलना करत असतानाच मला हिंदी सारेगमपचा फोलपणा दिसून आला. माझ्या मते गजेंद्र सिंह सारेगमपच्या हिंदी वर्जन हास्यास्पद व मेलोड्रामाटिक करण्यात काही कसर सोडत नसतील! तईच गत अंताक्षरीची.एका भाग पाहत होतो तर उगाच हिमेश रेशमिया आशा भोसलेंशी वाद घालत होता, नंतरच्या भागात इस्माईल दरबार अजून कोणाच्या नावाने उखडला होता. स्टारवरच्या वॉईस ऑफ इंडियात अलका वि. अभिजीत वि. बप्पी वि. ललित असा सामना रंगला होता!! आपला कार्यक्रम लोकप्रिय करण्यासाठी हे लोक काय-काय करतील काही नेम नाही!

10 March 2007

ब्लॉगर मध्ये थेट मराठीत टंकलेखन करा- Blogger allows to type directly in Marathi

http://help.blogger.com/bin/answer.py?answer=58226

ब्लॉगर मध्ये लेख/पोस्ट लिहिताना आता तुम्हाला बरहा इत्यादी सॉफ्टवेयरची गरज लागणार नाही. ब्लॉगर मध्ये तुम्ही थेट मराठीत लिहू शकता. अधिक माहिती वरील लिंक वर उपलब्ध आहे.

09 March 2007

राज ठाकरे बिहारींना 'चापट' देणार! Raj Thackeray 'slaps' Biharis!

वा! वा! वा! बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निकालात 'महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा' निकाल
लागल्यावर राज ठाकरे यांना उशिरा का होईना पण शहाणपण सुचले आहे. ते युपी-बिहारी
लोकांना कॉंग्रेस-समाजवादी सारख्या पार्ट्या आपल्याशा वाटतात,ते लोक कदापी
शिवसेना-मनसेला मते देणार नाहीत. का सारखे त्यांच्या मतांसाठी भीक मागता? मराठी
माणसाने 'दणका' दिल्यावर राज यांनी 'युटर्न' घेतला हे बरे झाले. सेनेला स्पर्धा हवीच
नाहीतर हे लोक संजय निरुपम, राम जेठमलानी, प्रितीश नंदी अशा दगडांना पक्षातर्फे संसदेत
पाठवतात. राज ठाकरे यांनी हा मुद्दाच चालवला पाहिजे,किंबहुना ते जे बोलतात ते करुन
दाखवावे अशी मराठी लोकांची त्यांना कळकळीची विनंती आहे.

सहारा समय नामक हिंदी वाहिनी वर जैसवाल, रविशंकर प्रसाद आणि संजय निरुपम याची
'प्रतिक्रिया' विचारली गेली. त्यात संजय निरुपम (लखनऊहून- पाहून आनंद झाला,तेथेच रहा
कायमचा!) असा बोलला की त्यांनी एक बोट दाखविले तर आम्ही 'पाच बोटांनी' उत्तर देऊ!!
युपी-बिहारींची पाच बोटांची असलेले नेते आम्हांस ठाऊक आहेच पण हे नालायक लोक इतके माजले
आहेत की राष्ट्रीय वाहिनीवरुन (आमच्या घरात येऊन) आम्हालाच अक्कल शिकवतात. संजय
निरुपमच्या वक्तव्याने राज ठाकरे जे बोलले ते योग्यच होते याची खात्री पटली. उद्या म्हणे
लालू यादव विलासरावांशी बोलणार आहे.लालूला म्हणावे directly सोनियांशीच बोल ना!
कॉंग्रेसच्या मुख्यमंत्री दिल्लीच्या आन्येबाहेर नाहीत...

Raj's remark on Biharis sparks off controversy
Posted at Friday, 09 March 2007 19:03 IST

Mumbai, March 9: Maharashtra Navnirman Sena (MNS) chief Raj Thackeray today sparked off controversy by making statement over the increasing number of non-Maharashtrians in the state, Sahara Samay sources said.

Calling on Marathi-speakers to introspect why immigration to this city has increased, Raj Thackeray today said his party will not compromise on Maharashtra's culture and pride.

Addressing a packed gathering of MNS workers on the occasion of his party completing a year, Raj made an impassioned plea to Marathi people by saying, "We must introspect on who is to blamed for this state of affairs.

"After all, it is Maharashtrians who are in top posts in the city and in spite of that, slums have sprung up. It is Maharashtrians who are responsible for this because we have allowed it to happen. We have to introspect on this."

Raj also said, "We cannot progress by hating another community. But if somebody tries to trouble Maharashtrians while living in Mumbai, that will also not be tolerated.

"We will not compromise on Marathi pride and Marathi culture."

Reacting on the statement, Railway Minister and RJD chief Lalu Prasad Yadav condemned his remark on Biharis and said that he will discuss the issue with the Chief Minister tomorrow.

06 March 2007

मी मराठी सुरु झाली, Mi Marathi started!


काल अधिकारी ब्रदर्सची 'मी मराठी' वाहिनी सुरु झाली. मागील १०-१५ दिवसांत दोन नव्या वाहिन्या सुरु झाल्या आहेत, झी २४ तास आणी मी मराठी, त्यामुळे खूप आनंद झाला. मी मराठीचा एकूण थाट भव्य व आकर्षक आहे. मी काल अनेक मालिका पाहिल्या. पैकी भरत जाधवची 'दोन फूल एक डाऊटफूल' (यात त्याच्या दुसरी गुजराती बायको मराठी छान बोलते!- अधुरी एक कहाणी मधील एक रडरड रडणारी बया येथे चांगलं काम करतीये!), दावत, दिलखूलास, दोष ना कुणाचा इ. मालिका चांगल्या वाटत आहेत. त्याच बरोबर अधिकारी ब्रदर्सनी 'रटाळ' सह्याद्री-दुरदर्शन साठी बनवलेल्या 'रटाळ' मालिका पुन्हा आमचा छळ करायला दाखवत आहेत. दामिनी, बंदिनी आणखी काही-बाही मालिका पुन्हा बोर करायला उपटल्या आहेत. असो, पण ई.टी.वी मराठी पे-चॅनल झाल्यामुळे आमच्या केबल वाल्यानी बंद केल्यामुळे महिलावर्ग चांगलाच चिडला आहे! वर पठ्ठयाने झी २४ तास सुरु केला नाहीये.

03 March 2007

सारेगमपच्या ऑडिशन्स सुरु Saregamapa auditions started

सारेगमपच्या ऑडिशन्स सुरु झाल्या असून पुण्यात ५ मार्च कर्वे रोड येथे आहेत. मला भाग घ्यायचा नाहीये पण तेथे जाऊन जरा वातावरण पाहीन म्हणतो! आमच्या इथुन ई.टी.वी मराठी घालवल्यापासून निराशेचे वातावरण आहे. चार दिवस सासूचे, काटा रुते कुणाला, गोजिरवाण्या घरात इत्यादी मालिका दिसत नाहीयेत! असो ५ मार्चलाच मी मराठी वाहिनी सुरु होत आहे तर त्याबद्दल उत्सुकता आहे. पाहूया कशी आहे ती. घरावरील केबलची वायर हलवायला हवी नीट दिसत नाहीये केबल आमच्याकडे!

26 February 2007

रेल्वे अर्थसंकल्प: महाराष्ट्रावर पुन्हा अन्याय? Railway budget with discrimination against Maharashtra

नेहमी प्रमाणे नेहमीच्या 'बिहारी' रेल्वेमंत्र्यांनी नेहमीच पाने पुसल्या जाणाऱ्या महाराष्ट्रावर या ही वेळेस नेहमीच्या रेल्वे अर्थसंकल्पात अन्याय केला आहे. मला राग आणि विषाद वाटतो तो महाराष्ट्रातील खासदार (members of parliament) यांचा हे लोक, आपल्या राज्याच्या भल्यासाठी लालूंवर दबाव का आणीत नाहीत? मुंबई जी रेल्वेला उत्पन्नाबाबत सिंहाचा वाटा देते तिथे फक्त उत्तर प्रदेश बिहार व अन्य बिमारु राज्यातील गाड्या आणल्या जातात. त्यात भर म्हणून पुणे-गोरखपूर गाडी सुरु केली आहे. माझ्या माहितीप्रमाणे पुण्यातले लोक चुकुनही गोरखपुरला जात नाहीत. आम्हाला औरंगाबाद, नाशिक व नागपुरच्या गाड्या वाढवून हव्या आहेत. पुणे-लोणावळा व पुणे-दौंड उपनगरीय गाड्यांबाबत विचार केला जावा अशी आमची इच्छा. आमच्या ४२ पिढ्यातील कोणीही पुणे-पटना वा पुणे-भागलपूर अशा गाड्या मागितल्या नव्हत्या. आशा पुढील वेळेस रेल्वेमंत्री बिहारचा नसेल. आणि हो, ममता पण नको!

25 February 2007

सारेगमप महागायक विजेता- अभिजीत कोसंबी Saregamapa winner Abhijeet Kosambi

काल आयडिया सारेगमपची महाअंतिम फेरी दिमाखात झाली. फक्त निकाल काय तो धक्कादायक होता. मंगेश बोरगांवकर किंवा अनघा ढोमसेंपैकी कोणी जिंकावे अशी माझी इच्छा होती पण जिंकला अभिजीत कोसंबी! खरं सांगायचं तर हा अभिजीत मला इतका चांगला गायक अजिबात वाटत नाही. महाअंतिम फेरीपर्यंत मजल मारली ते ठीक आहे पण अनघा व मंगेश ह्यांचं गाणं अत्यंत कानांना मधुर वाटतं. मला संगीतातले काही समजत नाही पण अभिजीतला 'मल्हार वारी' आणि सावरखेड-एक गाव मधले 'हे गाव माझे' या उत्तम गाण्यांची वाट लावताना मी ऐकले आहे! काल बाद झालेल्या स्पर्धकांनी सोहळ्याच्या सुरुवातीला म्हटलेले 'तु चाल पुडं तुला रं गड्या भीती कुनाची' हे गाणं सर्वात उत्तम होते.

असो, कालच्या सोहळ्यातील सर्वात चिड आणणारी गोष्ट म्हणजे जेव्हा अभिजीतला महागायक ची ट्रॉफी दिली गेली तेव्हा अशी घोषणा करण्यात आली की त्याला हिंदी सारेगमप मध्ये (म्हणजे Hero Honda Saregamapa!) 'डायरेक्ट' प्रवेश मिळाला आहे. हा म्हणजे मूर्खपणाचा कळस आहे. येथे विजयी होणारा स्पर्धक तावून-सुलाखून निघाला आहे. त्याने सारेगमपची परीक्षा पास केली आहे त्याला पुन्हा हिंदीतील त्याच स्पर्धेत का बसवता? काय हिंदी कार्यक्रमाचा दर्जा मराठीपेक्षा जास्त आहे? का हिंदी सारेगमप मध्ये भाग घेऊन त्याचे हात आकाशाला टेकणार आहेत? त्याला जर nationwide exposure द्यायचंय तर त्याला हिंदी अल्बम ऑफर करा ना. कमीत कमी मराठी अल्बम काढायलाच हवा. पण इथेच मराठी माणसांचं चुकतं! नेहमी हिंदीकडे का पाहता? हिंदी सारेगमप म्हणजे अत्यंत हास्यास्पद कार्यक्रम आहे. घडवून आणलेल्या controversies, परिक्षकांमधील फालतू व बाष्फळ वाद इत्यादीं मुळे TRP वाढवणे इतकाचं यांचा उद्योग आहे. सारेगमप, लिटील चॅम्प्स आणि नंतर एक मै और एक तु इत्यादी रटाळ कार्यक्रमात भाग घेणं हे महागायकाला नक्कीच शोभणारं नाही.मराठी दहावी पास झालेल्या मुलाला परत हिंदीच्या पहिल्या इयत्तेत का बसवता?

24 February 2007

झी २४ तास आणि मी मराठी

मला खूप आनंद झालाय! झी नेटवर्कची झी २४ तास ही मराठीतील पहिली वृत्तवाहिनी सुरु
झाली आहे आणि लौकरच अधिकारी ब्रदर्सची 'मी मराठी' वाहिनी सुरु होत आहे. मराठी
दुरचित्रवाणीचे क्षेत्र विस्तारत आहे हे पाहून बरं वाटतंय. आमच्या कंबख्त केबलवाल्यानं झी २४
तास अजून सुरु केली नाहीये आणि त्याच बरोबर ई.टी.वी मराठी बंद केली आहे. (पे चॅनल झालंय
म्हणून?) मी मराठीचे चाचणी प्रक्षेपण पाहिले. माझ्या मते ही वाहिनी लोकप्रिय होण्यास
वेळ लागणार नाही. फक्त दामिनी, बंदिनी सारख्या मालिका दाखविल्या नाहीत म्हणजे मिळवली!

15 February 2007

सारेगमप ची महाअंतिम फेरी Saregamapa's grand finale




आयडीया सारेगमपची अंतिम फेरी २४ फेब्रुवारीला आहे. या सोमवारी झालेला गोंधळ म्हणजे
दुर्दैवी व स्पर्धकांवर अन्याय करणारा होता. प्रेक्षकांच्या मतानुसार अभिजीत कोसंबी बाहेर
जाणार होता पण परिक्षकांनी ''आम्हाला तिघातील कोणीही गेलं तर वाईट वाटेल'' असा
हट्ट धरला आणी अभिजीतला जीवदान मिळाले. हे अत्यंत चुकीचे आहे. जर तुम्हाला ''कोणीही''
गेला तरी दु:ख होणार होतं (खरंतर अभिजीत कोल्हापूरचा असल्यामुळे अवधुतला दु:ख झालंय!)
तर मग प्रेक्षकांना एसएमएस करायला कशाला सांगितल? अभिजीत कोसंबी हा ठीक गातो पण
त्याच्यासाठी नियम बदलणं वेडेपणा आहे. त्याला जर retain केल गेलं आहे तर आनंदी जोशीला
का नाही? Judgesच्या ह्या एकतर्फी निर्णयाचे आम्ही निषेध करतो.


असो. सोमवारी अनघा ढोमसेनी म्हटलेले ''सर्वस्व तुजला वाहूनी माझ्या घरी मी पाहुणी'' हे
गाणं तसेच प्रत्येक स्पर्धकानी म्हटलेली निवडक गाडी झी मराठीच्या साईट वर उपलब्ध आहेत.

http://zeemarathi.com/Saregamapa/songs.aspx महाअंतिमफेरी साठी मंगेश बोरगांवकर
किंवा अनघा ढोमसे पैकी कोणीही जिंकू देत,दोघही चांगले गातात. पण आनंदीजर grand
finaleत असती तर...alas!

03 February 2007

अरुण साधु म्हणतात मराठीत बोला! Arun Sadhu says ''converse in Marathi''

अरुण साधू यांनी समस्त मराठीजनांच्या मनातील चिंता बोलून दाखवली आणि ती मिटवण्यासाठी मार्ग सुध्दा दाखवला आहे. नुसतं मराठी  वाचवा वाचवा म्हणण्यापेक्षा कृती करा. हा ब्लॉग लिहिणा-यानी कधीच हिंदीची चिंधी करुन मराठी बोलण्यास सुरुवात केली आहे! त्यामुळे हक्कानी विनंती करतो. मराठीतच बोला आणि साधूंनी म्हटल्याप्रमाणे इंग्रजीची शिडी सारखा वापर करा!



ग. त्र्य. माडखोलकर नगर, कुसुमानील नगरी (नागपूर) ता. 2 - झपाट्याने बदलणाऱ्या जगात मायमराठीचे संचित टिकविण्यासाठी थोडी हिंमत धरून महाराष्ट्रात सार्वजनिक ठिकाणी मराठीच बोला, असे कळकळीचे आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अरुण साधू यांनी आज केले. ......
जगातील बारा- पंधरा प्रमुख भाषांपैकी असलेल्या मराठीचा आत्मा गमवायचा नसेल, तर हे करावेच लागेल, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. येथे सुरू झालेल्या 80 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते व प्रख्यात साहित्यिक नामवरसिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्या वेळी श्री. साधू बोलत होते. मुख्य संरक्षक दत्ता मेघे, अनिल देशमुख, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर, कार्यवाह वामन तेलंग, स्वागताध्यक्ष गिरीश गांधी, विदर्भ साहित्य संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. उन्हाची वाढलेली तीव्रता, एरव्ही तुलनेने सामसूम असलेला सिव्हिल लाईन्स परिसर आज गजबजला होता. साहित्य शारदेच्या मंगल सोहळ्यासाठी हजारो रसिकांची पावले माडखोलकर नगराकडे झपाझप निघाली होती. दुपारी चारच्या आधीच दहा हजार क्षमतेचा मंडप खचाखच भरून गेला होता.

गेल्या 25 वर्षांत महाराष्ट्राचा इतिहास गुणात्मक घसरणीचा आहे, असे स्पष्टपणे नमूद करून मराठी माणसालाच मराठी बोलण्याची लाज वाटते, हे दाहक वास्तव श्री. साधू यांनी मांडले. प्रशासन, राजकारण, औद्योगीकरण, अर्थकारण, शिक्षण आदी क्षेत्रांत महाराष्ट्राची गेल्या 25 वर्षांत वेगाने पीछेहाट होत आहे, असे सांगून ते म्हणाले, ""जागतिकीकरणाच्या लाटेवर कौशल्याने स्वार झाले पाहिजे. सांस्कृतीकरण व साहित्यकारण हे राजकारण, अर्थकारण व समाजकारणापासून वेगळे राहू शकत नाही.''

लेखक, समीक्षकही श्री. साधू यांच्या टीकास्त्रातून सुटले नाहीत. पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबादेपासून दूरच्या एखाद्या गावात लिहिणाऱ्यांना कोणी विचारत नाही. उपेक्षित भागातील शेकडो कवी साहित्य विश्‍वाने दखलही न घेतल्याने खुडून जातात, हे मराठी साहित्याचे नुकसानच आहे, असे सांगून ते म्हणाले ""समीक्षकांची साहित्यिकांशी जास्त घसट असू नये. मराठी सांस्कृतिक विश्‍वाचा एकोपा साधण्यासाठी तरी समीक्षकांचे वेगळे प्रभावी व्यासपीठ असले पाहिजे.'' मराठीची उपेक्षा मराठी माणूसच करीत आहे. मराठी माणसाचे स्वभाषेविषयीचे प्रेम ढोंगी आहे. त्याची अस्मिता बेगडी आहे आणि भाषेचा अभिमान पोकळ आहे, असे सपासप फटकारे ओढतानाच दहा कोटी लोकांची माय मराठी मरणपंथाला वगैरे निश्‍चितच लागलेली नाही, असा विश्‍वासही श्री. साधू यांनी ठामपणे व्यक्त केला. मराठी समाजाचा मूलभूत न्यूनगंड, व्यापाराविषयीची उदासीनता, अतिरेकी सहिष्णुता व फाजील आत्मविश्‍वास हेच हिंदी भाषकांचे राज्यात होणारे स्थलांतरामागील आणि मराठीच्या पीछेहाटीमागील मुख्य कारण आहे, असे सांगून मराठी ज्ञानभाषा होणे आता शक्‍य नाही व कोणत्याच भाषेवर मराठीचे प्रभुत्व नाही, असे स्पष्टपणे नमूद केले. तत्कालीन साहित्यिक व मराठी अभिजनांनी मराठीला ज्ञानभाषा न करण्याचा अपराध केला आहे, असेही खडे बोल त्यांनी सुनावले. आज संक्रमणावस्थेतील मराठीसाठी त्याग करण्याची तयारी कोणत्याच मराठी वर्गाची नसूनही पुढील एक- दीड शतकात मराठी भाषेत गुणात्मक बदल घडेल, असे भाकीतही त्यांनी वर्तविले.

13 January 2007

'बिनधास्त' आत हिंदीत- Friendship

मच्छिंद्र चाटे ह्याच्या 'बिनधास्त' ह्या मराठी चित्रपटाच्या हिंदी रीमेक फ्रेंडशिप (Friendship) च्या पानभर जाहिराती मराठी वृत्तपत्रात दिसत आहेत. बिनधास्त हा मराठी चित्रपट उत्तम जमला होता. चाटे त्याचा हिंदी रिमेक बनवत आहेत ही चांगली गोष्ट आहे पण त्यांचा सर्व भर मराठी वृत्तपत्रात/प्रसारमाध्यमांत जाहिराती देण्यात आहे. मराठी माणसांनी original मराठी चित्रपट पाहिला आहे. ते का म्हणून पुन्हा तोच चित्रपट हिंदीत बघतील? परत त्यांच्या जाहिराती देखिल unconventional आणि बऱयाच प्रमाणात हास्यास्पद आहेत. चित्रपटाची जाहिरात हा लेख नसतो. तो जर मराठी असता तर आम्ही त्या भावनीक आवाहनाला प्रतिसाद दिला असता. जाहिरातींचा एकूण सुर म्हणजे "मायमराठीच्या प्रेक्षकहो, मी एक हिंदी चित्रपट बनवून एक महान आणि अविश्वसनीय काम केले आहे,तर आपण त्याला साथ द्या''. जणू काही हिंदी भाषेत चित्रपट बनवणे ही एक अभिमानास्पद बाब आहे. यालाच म्हणतात मराठी माणसाचा न्युनगंड. एक तर त्यांनी हिंदी चित्रपट बनवला असेल तर तो एकत्रीत पणे भारतभर रिलीज करायला हवा होता. आधी महाराष्ट्रात व मग उर्वरीत भारतात असं का?

मला तर हिंदी वा हिंदी चित्रपटाचे अजिबात कौतुक नाहीये. हिंदी चित्रपट फुकट केबलवर पहावयास मिळाले तर बघावे आणि आपले पैसे फक्त मराठी चित्रपटांवर खर्च करावा. तशीही हिंदी चित्रपटांची थिएटर/मल्टिप्लेक्स मध्ये पैसे खर्चून बघण्याची लायकी नसते.

असो, चाटेंना आवाहन. हिंदीत चित्रपट बनवलात चांगली गोष्ट आहे. त्याचं मराठी वृतपत्रात कौतुक करवून घेऊ नका. हिंदी भाषा वा हिंदी चित्रपट म्हणजे काय महान,स्वर्गीय व तत्सम नाही. तुमच्या चित्रपटाला भरघोस यश व पैसा मिळो. व तो तुम्ही जेव्हा मराठी चित्रपटांत लावाल तेव्हा आम्ही नकीच मल्टिप्लेक्स मध्ये बघायला येऊ.

11 January 2007

सा रे ग म प Sa re ga ma pa


परवा झी मराठी वरचे सारेगमप पाहिले. आमच्या घरी ई.टी.वी चे जास्त प्रस्थ असल्यामुळे मला झी मराठीवरच्या कार्यक्रमांची जास्त माहिती नव्हती. ३१ डिसेंबरच्या एका कार्यक्रमात सारेगमपची मंडळी औरंगाबादेत गात होती. (अगं बाई अरेच्चा मधील 'मल्हार वारी' या झकास गाण्याची वाट लावत होती!) पण नंतरची दादा कोंडक्यांची गाणी ठीक म्हटली. तेव्हापासून मला सारेगमप माहित झाले आणि मराठीत reality show चालू असल्याचे समाधान वाटले.

परवा प्रथमच पूर्ण भाग पाहिला. नव्या गाण्यांचा विशेष भाग होता. महेश मांजरेकर (भयानक चेहरा आणि तोडकं मराठी बोलत होता. हिंदीत गेल्यावर यांचे चालढंग, कपडे आणि केसं सगळंच बदलत!) विशेष अतिथी होता. बहुतेक स्पर्धकांनी चांगली गाणी म्हटली. BTW माझी फ़ेवरेट मुंबईची आनंदी जोशी आहे. तिचा चेहरा आणि आवाज खूप आवडला! आनंदी ने अवधूत गुप्ते याचे गाणे म्हटले. मी कधी ऐकले नव्हते पण हा माणूस चांगला संगीतकार आहे. इतर काही स्पर्धकांनी सुध्दा त्याची गाणी म्हटली. कोल्हापूरच्या अभिजीत कोसंबीने 'वाऱ्यावरती रंग पसरले..' ह्या सुंदर गाण्याची वाट लावली.

पण सगळ्यात कमाल केली ते अनघा आणी मंगेश बोरगावकरानी. अनघाने कोणतं गांण म्हटल ते आठवत नाही पण मंगेशनी श्रीरंग गोडबोले लिखीत आणि अजय-अतुलचे संगीत असलेले 'महाराष्ट्र-गीत' म्हटले. ते त्यानी इतके जोशात गायले की अवधुतने म्हटल्याप्रमाणे अंगावर काटा उभा राहिला. सिंगर ऑफ द डे चा मान अर्थातच त्याला मिळाला. मी आता सारेगमपचे पुन:प्रक्षेपण कधी होतंय त्यावर नजर ठेवुन आहे. मला त्याचे गाणे रेकॉर्ड करायचं आहे. असो तुम्ही वोट देत आहात ना? या वेळेसचे माझे मत आनंदीला दिलं (आयडीया कंपनी चोर आहे,तीन रुपये पडतात एका smsला!) म्हणून मंगेशला वोट bsnl वरुन देणार आहे!

09 January 2007

उत्तरायण Uttarayan

उत्तरायण हा चित्रपट तुम्ही पाहिला नसेल तर सर्व प्रथम सीडी-डीविडी आणून तो पहा! अनेक जणांस माहित नसेल की बिपीन नाडकर्णी दिग्दर्शीत हा चित्रपट (भारताची अधिकृत ''एंट्री'' म्हणून) ऑस्करच्या शर्यतीत होता. पण आपली देशाची एकूणच सर्व system किती सदोष आहे ह्याचं ठळक उदाहरण म्हणजे उत्तरायण सोडून अत्यंत चुकार असा 'पहेली'' हा चित्रपट ऑस्करला पाठविला गेला (आणि अर्थातच आपटला). त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे अमोल पालेकरांनी त्या फालतू हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. असो. उत्तरायण सारखा सर्वांग-सुंदर चित्रपट अजिबात चुकवू नये असा आहे.
उत्तरायण चित्रपट जयवंत दळवींच्या ''दुर्गी'' या कथेवर आधारीत आहे. चित्रपटांच्या सुरुवातीचे १९६०च्या पुण्याचे वातावरण बघून मला आजकालच्या ग्लोबलाईझेशनच्या धावपळीचा कंटाळा आला. चित्रपटांच्या सुरुवातीचे सुमधुर संगीत मनाला वेड लावते. उत्तरायणच्या संहितेबरोबरच संगीत हे या चित्रपटाचा plus point आहे. कुठल्याशा मराठी चॅनलवर उत्तरायणचे मेकिंग दाखवित असताना ह्या gifted संगीतकाराची ओळख झाली. (ह्या मेकिंगच्या वेळीस दिग्दर्शकांनी एकही मराठी शब्द उच्चारला नाही). सगळीच्या सगळी गाणी श्रवणीय आहेत. गाणी कुलटोड या साईटवर उपलब्ध आहेत.


नीना कुलकर्णी आणि शिवाजी साटम ह्यांनी उत्तम काम केलंय. पण मला विशेष आवडलेले चेहरे म्हणजे तरुण नीना कुलकर्णीची भुमिका करणारी अभिनेत्री (जी आता बेटियाँ अपनी या पराया धन नामक रटाळ मालिकेत काम करते) आणी शिवाजी साटम ह्यांच्या सुनेची भुमिका करणारी (उन-पाउस मधील प्रिया). त्याच बरोबर blink and miss अश्या एकाच सीन मध्ये असलेली प्रियाची मैत्रीण सुध्दा सुरेख दिसते!

हिंदीतील बंडल लव-स्टोरीज पेक्षा उत्तरायण ही mature लव स्टोरी सर्वांना भावेल अशीच आहे. त्यामुळे हा चित्रपट पहाच आणि मला सांगा तुम्हाला कसा वाटला ते!
जाता जाता मला वेड लावणार्या उत्तरायणातील एका गाण्याच्या काही ओळी-
धुंद होते शब्द सारे धुंद होत्या भावना..
वाऱ्यासंगे वाहता त्या पुलापाशी थांबना..
रमुनी साऱ्या या जगार रिक्त व्हावसे परी..
तैसे गुंफू गीत हे....

08 January 2007

राजनाथ म्हणतात मुंबईत मराठीत बोला ! Rajnath says speak Marathi in Mumbai !

या बातमी ने आम्हांस अत्यंत दिलासा मिळाला. बाळासाहेबांनी हिंदुत्व सोडून 'मराठीपणा'
वर जास्त लक्ष द्यावं,मुंबईत भगवा फडकवयाचा असेल तर...

मुलायमना खाली खेचा Mulayam should go

नोयडाचं भयंकर कांड घडले तरी माननीय मुख्यमंत्री मुलायम सिंग यादव ह्यांनी स्थळास भेटही
देऊ नये? त्यांचा भाऊ येतो आणी 'फारसं गंभीर घडलं नाही!' अशी मुक्ताफळ उधळतो. माननीय
अमर सिंग (अमिताभदादा, जयावहिनी, अभिषेक भाच्या बरोबरच्या पार्टी संपल्यामुळे) टीवी
वर येतात काय आणि निठारी सोडून मूर्खासारखं कॉंग्रस व दिल्ली प्रशासनावर ताशेरे ओढतात.
अर्थात त्या माणसाकडून अजून काहीच अपेक्षा नाही. हे राजकारणी लोक इतके निर्लज्ज आणि
नालायक आहेत की काही बोलता सोय नाही.ह्यांच्या मुलांना पळवून, त्यांच्यावर दुष्क्रुत्य
करुन, त्याना खाऊन मग त्यांची हाडं गटारांत टाकली असती तेव्हा ह्यांना समजलं असतं... वेळ
आली आहे Justice for Nithari करीता.

ULFA kills Biharis! उल्फाचा उत्पात!

उल्फ़ाचा उत्पात!
उल्फांनी बिगर आसामी लोकांवर केलेल्या हल्ल्यांमुळे भयभीत झालेल्या हिंदी भाषिकांनी आसाममधून बाहेर पडण्यास सुरूवात केली. पंधरा-वीस जणांच्या समूह बिहारकडे परतण्यासाठी गुवाहाटी स्थानकावर उभा असल्याचे वृत्त आहे. राज्य प्रशासनाने हे वृत्त नाकारले आहे. दिब्रुगड, तीनसुकीया, सिबसागर या ठिकाणी उल्फांनी घडवून आणलेल्या हिंसाचारात ६४ जण ठार झाले तर चाळीस जण जखमी झाले.

हे सगळं केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे झाले आहे. केंद्र सरकारने भारतातील सर्व राज्यांना समान वागणूक कधीच दिली नाही. बिहार, उत्तर भारत,इशान्येकडील राज्ये मागास राहिली. मुंबई/महाराष्ट्र प्रगत झाली परंतु केंद्राने कधीही येथील भुमिपुत्रांना किंमत दिली नाही. उत्तर भारतीय लोकांच्या big brother attitude मुळे महाराष्ट्रात जिथे पहावे तिथे ही हिंदी लोक येतात आणि धुमाकूळ घालतात.
असो, आसामच्या लोकांना अथवा एकूणच इशान्येकडील लोकांवर जोरजबरद्स्ती करुन काहीही साध्य होणार नाही. त्यांची असंतुष्टता संपवण्यासाठी केंद्राने त्यांच्या भावनांची कदर करायला हवी. भारतीय सैन्याने कलकत्तयात काय गुण उधळले हे आपण पाहिलेच, मग ही लोक मणिपूर मध्ये काय धुमाकूळ घालतील ह्याची कल्पनाच न केलेली बरी. केंद्राच्या टाळक्यात ही गोष्ट येत नाही की मणिपूरी लोक ह्यांची सैन्याला कमी अधिकार द्यावा ही मागणी योग्य तर आहेच पण त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी हे पाऊल उचलले गेले पाहिजे.